” प्रयत्न केल्याने परमेश्वर आपल्याला नेहमीच मदत करतो, असा माझा विश्वास आहे. कधी कधी एखादा मोठा प्रकल्प हातात घेताना मला भीती वाटते की आपण एवढे करू शकू का?. कारण शेवटी सगळं संबंध पैशाशी येतो. मग अशा प्रसंगी जेव्हा मी एखाद्या वेळी निराश अथवा उदीग्न होतो तेव्हा मग धिरूभाई अंबानी यांनी कसं काम केला होता? कर्मवीर भाऊराव पाटीलांनी कसं काम केला होता? शिवाजी महाराजांनी कसं काम केला होता ? त्यांनी आग्रा येथून कशी सुटका करून घेतली होती? असे हे सर्व प्रसंग मला आठवतात आणि मग आपल्याला त्यातून स्फूर्ति आणि प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतुनच माझ्यात उत्साह निर्माण होतो आणि मग मी जोमाने पुन्हा कामाला लागतो. अशा दृष्टीकोणातून आम्ही सर्व विचार करून हे काम करीत असतो . “
जे. के. जाधव (दादा)
